गुरुवारी (20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदाद येथे दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू झाला. या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी विरोधी संघाचा हा निर्णय चुकीचा ठरवत तुफानी फलंदाजी करत भारताला दमदार सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या सत्रातच 20 षटकात बिनबाद 100 धावा करत मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली.
पहिल्या सामन्यात रोहित व यशस्वी यांच्या शतकांच्या जोरावरच भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. या दोघांनी पहिल्या सामन्यात 200 धावांची विक्रमी भागीदारी केलेली. या सामन्यात देखील त्यांनी तसाच खेळ सुरू केला.
सुरुवातीला यशस्वी याने आक्रमक रूप धारण करत तीन चौकार वसूल केले. मात्र, त्यानंतर रोहितने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेत आक्रमण केले. दोघांनी 20 षटकातच 100 धावा केल्या. यादरम्यान रोहितने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 15 वे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर काही षटकांच्या अंतरानेच यशस्वी याने देखील आपल्या सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली. अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत भारताने 23 षटकात बिनबाद 118 धावा केल्या होत्या.
(WIvIND Rohit Sharma And Yashasvi Jaiswal Hits Fifties India Past 100)
महत्वाच्या बातम्या –
WIvIND: दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची प्रथम फलंदाजी! मुकेश कुमारचे पदार्पण, विराटचा 500 वा सामना
पंतच्या फिटनेसविषयी मोठी अपडेट! यष्टीरक्षक फलंदाजाला विश्वचषकात खेळायचाय, वेटलिफ्टिंगला केली सुरुवात