भारतातील क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक लहान मुलाचे स्पप्न असते की, मोठे होऊन भारतीय संघासाठी (indian cricket team) खेळायचे. पण हे स्वप्न पूर्ण करणे सोपे नसते. त्या मुलांतील खूपच कमी असतात जे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना क्रिकेटच्या प्रत्येक पातळीवर स्वतःला सिद्ध करत जावे लागते. भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी सर्वात महत्वाच्या परिक्षांपैकी एक असते ती, म्हणजे रणजी ट्रॉफी. रणजी ट्रॉफीत चांगले प्रदर्शन केल्यानंतर खेळाडूंसाठी भारतीय संघात प्रवेश करण्याचा मार्ग सोपा होतो.
असे असले तरी, भारतीय संघात असे काही दिग्गज होऊन गेले आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची छाप सोडली आहे, पण रणजी ट्रॉफीमध्ये एकदाही जेतेपद मिळवू शकले नाहीत. आपण या लेखात अशाच पाच भारतीय दिग्गजांचा विचार करणार आहोत, ज्यांनी भारतीय संघासाठी अनेक महत्वापूर्ण विक्रम केले. मात्र, रणजी ट्रॉफी ते एकदाही जिंकू शकले नाहीत.
भारताचे चार महान खेळाडू ज्यांनी कधीच रणजी ट्रॉफी जिंकली नाही.
४. मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azaruddin) –
मोहम्मद अजहरुद्दीन यांना १९८५ साली सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटर पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ९९ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये ४५.०३ च्या सरासरीने २२ शतके केली. मात्र, रणजी ट्रॉफीतील त्यांचे आकडे पाहता, ते राष्ट्रीय संघासाठी केलेल्या खेळीपेक्षा सामान्य आहेत. अजहरुद्दीन त्या खेळाडूंमध्ये सामील आहेत, एकही रणजी ट्रॉपी जिंकली नाही.
अजहरुद्दीन यांनी १९८१ साली हैदराबाद संघाकडून रणजीमध्ये पदार्पण केले होते. रणजी पदार्पणानंतर तीन वर्षांनी त्यांची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्यानी साल २००० पर्यंत रणजी क्रिकेट खेळले, पण यादरम्यान त्यांचा संघ एकदाही रणजी स्पर्धेची ट्रॉफी जिंकू शकला नाही. २००० मध्ये अजहरुद्दीन मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचे आढळले आणि त्यानंतर त्यांची क्रिकेट कारकीर्दच संपुष्टात आली.
३. व्हीव्हीएस लक्ष्मण (vvs laxman) –
लक्ष्मण यांनी १९९६ साली कसोटी पदार्पण केले होते. ते कसोटी क्रिकेटमधील भारताचे एक महत्वाचे फलंदाज होते. त्यांना लोक त्यांच्या फलंदाजीतील उत्कृष्ट टायमिंगसाठी ओळखत होते. मोहम्मद अजहरुद्दीन लक्ष्मण यांचे आयडल होते. लक्ष्मण यांच्या खेळात अजहरुद्दीन यांची झलक पाहायला मिळायची. रणजी ट्रॉफीत देखील लक्ष्मण यांनी अजहरुद्दीनप्रमाणे एकदाही जेतेपद जिंकले नाही.
लक्ष्मण यांनी १९९३ साली त्यांचे रणजी पदार्पण केले होते आणि २०१२ पर्यंत त्यांनी रणजी क्रिकेट खेळले. त्यांचे वैकक्तिक प्रदर्शन पाहता, ते उत्तम होते आणि त्यांनी ५००० पेक्षा जास्त धावा केल्या. यामध्ये त्यांच्या तीन दुहेरी शतकांचा देखील समावेश होता. असे असले तरी, त्यांना रणजी ट्रॉफी जिंकता आली नाही.
२. युवराज सिंग (yuvraj Singh)-
युवराजने त्याच्या कारकिर्दीत सर्वोत्तम प्रदर्शन विश्वचषकादरम्यान केले आहे. त्याने २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ मधील एकदिवसीय विश्वचषकात केलेल्या प्रदर्शनामुळे भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी खूप मदत मिलाली होती. युवराज त्याच्या सर्वात वेगवान अर्धशतकासाठी देखील ओळखला जातो. त्याने आतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११,००० धावा केल्या आहेत आणि १०० विकेट्स देखील घेतल्या आहेत. मात्र, त्याची रणजी कारकीर्द काही चांगली राहिली नव्हती.
युवराजने १९९७ मध्ये पंजाब संघासाठी रणजी पदार्पण केले होते. रणजीतील प्रदर्शनानंतर २००० साली त्याने भारतीय संघात पदार्पण केले. भारतीय संघासोबत खेळताना त्याने अनेक विक्रम केले, पण रणजी क्रिकेटमध्ये त्याला एकदाही जेतेपद जिंकता आले नाही.
१. एमएस धोनी (ms dhoni) –
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. चाहते त्याला कॅप्टन कूल या नावाने ओळखतात. धोनीच्याच नेतृत्वात भारतीय संघाने २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ साली एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. धोनीला आतापर्यंतच्या सर्वोत्तम मॅच फिनिशर्सपैकी एक मानले जाते. मात्र, रणजी क्रिकेटमधील त्याचे प्रदर्शन अपेक्षित नव्हते.
त्याने २००० साली बिहार संघासाठी त्याचे रणजी पदार्पण केले होते. त्याचे पहिला रणजी सामना जमशेदपूरमध्ये आसाम संघाविरुद्ध खेळला होता. रणजीतील प्रदर्शनाच्या जोरावत त्याने २००३-०४ मध्ये भारतीय संघात स्थान बनवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने सतत चांगेल प्रदर्शन कले आणि मोठ्या काळासाठी भारताचे नेतृत्व देखील केले. भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वात अनेक स्पर्धांची जेतेपदे जिंकली. मात्र, रणजी स्पर्धेत त्याला एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही.
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियासाठी २०२१ वर्ष राहिलंय दुर्देवी, ऐतिहासिक विजय तर मिळवलेच पण २ आयसीसी ट्रॉफीही गमावल्या
टीम इंडिया १६ डिसेंबरला होणार दक्षिण आफ्रिकेला रवाना, ‘इतके’ दिवस राहणार बायो-बबलमध्ये