भारतात कोरोना संक्रमणाने विक्राळ रूप धारण केले आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा देखील निर्णय घेतला. कारण आयपीएलच्या तीन संघातील खेळाडूंना तसेच सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली होती. तसेच ग्राऊंड स्टाफला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.
आता अनेक आजी-माजी खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर काहींनी हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता, असे मत व्यक्त केले आहे. भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज सुरिंदर खन्ना यांनी देखील आता आपले मत मांडले आहे.
बीसीसीआयला दिला सल्ला
सुरिंदर खन्ना यांनी बीसीसीआय आणि आयपीएलला एक महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. त्यांच्या मते बीसीसीआय आणि आयपीएलने कोरोना विरोधी लढ्यासाठी कमीत कमी १०० कोटी रूपयांची मदत करायला हवी. ते म्हणाले, “आयपीएल या आधीच रद्द व्हायला हवे होते. फ्रँचायझी किंवा बीसीसीआयने याआधीच याबाबत विचार करायला हवा होता. केवळ नफ्यासाठी हंगाम खेचले जात होता का? लोकांच्या आयुष्याची खेळणे योग्य नव्हते.”
तसेच खन्ना यांनी बायो बबल वर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “मागील वर्षी युएई मध्ये शानदार पद्धतीने आयोजन झाले होते. बायो बबल व्यवस्थित सांभाळल्या गेले होते. वेळोवेळी चाचण्या देखील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे संक्रमण पसरले नव्हते. यावेळेला हे कसे झाले, मला समजत नाही.”
बीसीसीआयचे अडीचशे कोटींचे नुकसान
दरम्यान, आयपीएल रद्द झाल्याचा बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसला आहे. बीसीसीआयचे जवळपास २००० ते २५०० कोटींचे आर्थिक नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. आयपीएल मध्येच स्थगित केल्याने प्रक्षेपण वाहिनी असलेल्या स्टार स्पोर्ट्स कडून बीसीसीआयला येणार्या रकमेत घट होईल. तर मुख्य प्रायोजक असलेले व्हिवो आणि इतर सहाय्यक प्रायोजक देखील कराराची अर्धीच रक्कम अदा करतील. त्यामुळेच बीसीसीआयला तोटा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
या ३ प्रमुख कारणांमुळे आयपीएल संघांच्या बायोबबलमध्ये झाला कोरोना व्हायरसचा शिरकाव?
‘या क्षणाला भारत आणि आयपीएल दोन वेगवेगळे जग आहेत’
‘कोरोना हा आता विनोदाचा भाग राहिलेला नाही’, चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूची प्रतिक्रिया