भारतीय संघाचे माजी खेळाडू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी सध्याच्या भारतीय लेग स्पिनर्सवर निशाणा साधला आहे. सध्याचे लेग स्पिनर्स शिवरामकृष्णन यांच्या अपेक्षांना पात्र ठरतील, असे प्रदर्शन करण्यात अयशस्वी ठरत आहेत. त्यांनी याबाबत निराशा व्यक्त केली. त्यांच्या मते सध्याचे लेग स्पिनर्स कसोटी क्रिकेट खेळण्याला महत्व देत नाहीत आणि चेंडूला रिव्हर्स स्विंग करण्यावर अधिक भर देतात.
भारताचे माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी भारतासाठी ९ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी सध्याच्या भारतीय फिरकी गोलंदाजांविषयी त्यांचे मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, “मला खूप जास्त लेग स्पिनर्समध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याविषयी महत्त्वाकांक्षी दिसत नाही. ते मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळून समाधानी आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात मला वाटते, ते केवळ पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये यशस्वी होतात, जेव्हा फलंदाज आक्रमण करण्यावर लक्ष देतो आणि त्यांना विकेट मिळतो.”
त्यांच्या मते रिवर्स स्विंगवर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे अनेक फिरकी गोलंदाजांची कारकीर्द उद्धस्त झाली आहे. त्यांच्या मते “आता जुन्या झालेल्या चेंडुचा उपयोग रिव्हर्स स्विंग करण्यासाठी केला जातो. त्याचा सर्वाधिक परिणार लेग स्पिनरवर पडतो. लेग स्पिनर यापूर्वी कसोटी संघाच्या आक्रमणाचे केंद्र बिंदू असायचे. पण शेन वार्न आणि अनिल कुंबळे यांच्यासारख्या दिग्गजांनी निवृत्ती घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये लेग स्पिनर्सचा प्रभाव खूपच कमी दिसला आहे.”
स्पिनरची खरी परीक्षा कसोटी क्रिकेटमध्ये असते. ते पुढे बोलताना म्हणाले की, “एका लेग स्पिनरची खरी परीक्षा कसोटी क्रिकेटमध्ये असते. जेव्हा तीन क्षेत्ररक्षक जवळ लावलेले असतील. सध्याच्या काळातीत क्रिकेटमध्ये सर्वच लेग स्पिनर्स यामुळे यशस्वी होते आहेत. कारण, फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात चुका करतात. माझ्या लक्षात येत नाहीय की, भारतासाठी शेवटच्या वेळी लेग स्पिनरने केव्हा कसोटी सामना खेळला होता.”
दरम्यान, भारतीय गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे, भागवत चंद्रशेखर, सुभाष गुप्ते यांच्यासारखे दिग्गज लेग स्पिनर्स होऊन गेले आहेत. अनिल कुंबळेंनी भारतासाठी सर्वाधित ६१९ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळेंनी निवृत्ती घेतल्यानंतर अमित मिश्रा २२ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली. मात्र, त्याने यामध्ये अपेक्षित कामगिरी केली नाही. यादम्यान मिश्राने ७६ विकेट्स घेतल्या. मिश्रा २०१६ पासून कसोटी संघातून बाहेर आहे.
सध्याच्या भारतीय संघात युजवेंद्र चहल सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर आहे. त्याने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ५६ एकदिवसीय आणि ५० टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अद्याप त्याला कसोटी पदापर्णाची संधी मिळालेली नाही. त्याव्यतिरिक्त जागतिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे एडम जम्पा आणि इंग्लंडचा आदिल राशीद हे उत्कृष्ट लेग स्पिनर्स आहेत. ते मर्यादित षटकांमध्ये खेळण्यासाठी अधिक प्राधान्य देतात.