कोलकाता। भारतीय संघाने काल(24 नोव्हेंबर) इडन गार्डनवर बांगलादेश विरुद्ध पार पडलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची कसोटी मालिकाही 2-0 अशा फरकाने जिंकली
याबरोबरच भारतीय संघाने कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत 360 गुणांचा टप्पा गाठला आहे. भारताला कोलकाता कसोटीतील विजयानंतर कसोटी चॅम्पियनशीपचे 60 गुण मिळाले आहेत.
भारताने आत्तापर्यंत कसोटी चॅम्पियनशीपमध्ये 7 सामने खेळले असून एकही सामना गमावलेला नाही.
तसेच बांगलादेशची कसोटी चॅम्पियनशिपमधील ही पहिलीच मालिका होती. पण या मालिकेतील दोन्ही सामन्यात त्यांना भारताकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या खात्यात शून्य गुण आहे.
सध्या भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियापेक्षा 244 गुणांनी पुढे आहे.
ऑस्ट्रेलियानेही काल पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 1 डाव आणि 5 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे त्यांनाही या विजयानंतर कसोटी चॅम्पियनशीपचे 60 गुण मिळाले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचे 116 गुण झाले असून ते सध्या कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया पाठोपाठ या गुणतालिकेत प्रत्येकी 2 सामन्यांनंतर 60 गुणांसह न्यूझीलंड आणि श्रीलंका अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर त्यांच्या पाठोपाठ इंग्लंड 56 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांच्या खात्यात शून्य गुण आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटीनंतर कसोटी चॅम्पियशीपची गुणतालिका-
India continue their reign at the top in the ICC World Test Championship table. Their 2-0 series win over Bangladesh has taken them to 360 points.
Find out more ????https://t.co/bm1f3p5oW0
— ICC (@ICC) November 24, 2019
असे दिले जातात कसोटी चॅम्पियनशीपमध्ये गुण –
ही चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात होत आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या 9 देशांचा समावेश आहे.
तसेच 9 संघांना प्रत्येकी 8 प्रतिस्पर्ध्यांपैकी 6 संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहे. यामध्ये तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका परदेशात खेळायच्या आहेत. या मालिका 2 ते 5 सामन्यांच्या असतील.
या चॅम्पियशीपमध्ये होणाऱ्या प्रत्येक मालिकेसाठी एकूण 120 गुण असतील. म्हणजेच जर दोन सामन्यांची मालिका असेल तर या मालिकेतील एक सामना जिंकणाऱ्या संघाला 60 गुण मिळतील.
पण सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला प्रत्येकी 20 गुण आणि जर सामन्यात बरोबरी झाली तर दोन्ही संघाला प्रत्येकी 30 गुण दिले जातील. पराभूत होणाऱ्या संघाला एकही गुण मिळणार नाही.
जर मालिका 3 सामन्यांची झाली तर एका सामन्यात जिंकणारा संघ 40 गुण मिळवेल. तर अनिर्णित झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण आणि बरोबरी झाली तर दोन्ही संघांना प्रत्येकी 20 गुण दिले जातील.
या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये साखळी फेरीनंतर ज्या दोन संघांचे सर्वाधिक गुण असतील त्या दोन संघात जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर अंतिम सामना पार पडेल.
कसोटी चॅम्पियनशिपमध्ये असे मिळणार गुण –
किंग कोहलीचे नाव आता या दिग्गज कर्णधारांच्या यादीत सन्मानाने घेतले जाणार
वाचा????https://t.co/xB0bzbbe3w????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) November 24, 2019
कॅप्टन कोहलीचा नाद खूळा! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार
वाचा????https://t.co/vM2opGc0NO????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) November 24, 2019