नीरज चोप्राच्या यशामुळे संपूर्ण भारतात तसेच क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरातून नीरजचे कौतुक झाले मग भारतीय क्रिकेट संघ तरी कसा मागे राहील? भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी लंचदरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू ‘नीरज चोप्रा’ने सुवर्णपदक जिंकल्याची बातमी मिळाली. त्यानंतर सर्व खेळाडूंनी आनंद साजरा केला आणि त्यांचे अभिनंदन केले.
नीरज चोप्राने शनिवारी (८ ऑगस्ट) टोकियोमध्ये अंतिम फेरीत दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. भारताचे हे मैदानी खेळ प्रकारातील पहिले ऑलिम्पिक पदक ठरले, तर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो फक्त दुसरा भारतीय खेळाडू आहे.
नीरज चोप्राने ही कामगिरी केली, तेव्हा विराट कोहलीचा संघ चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात क्षेत्ररक्षण करत होता.
A special day for @Neeraj_Chopra1 and a special day for @WeAreTeamIndia! ????
It's a first gold medal at #Tokyo2020 and a first ever athletics gold for #IND pic.twitter.com/qF4BIXSK93
— The Olympic Games (@Olympics) August 7, 2021
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला, “आम्ही जेवणासाठी आत आलो, तेव्हा आम्हाला ही बातमी मिळाली आणि आम्ही एकच जल्लोष केला. सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणे ही एक मोठी कामगिरी आहे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याने ट्रॅक एँड फील्डमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले ही खूप मोठी कामगिरी आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचा अभिमान आहे. आम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचा खूप अभिमान आहे.”
अशाप्रकारे भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकून टोकियो ऑलिंपिक्स स्पर्धेतील आपली मोहीम संपवली. कोणत्याही एका ऑलिम्पिकमध्ये भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताविरुद्धच्या कसोटीसाठी ‘त्या’ गोष्टींचा सर्वाधिक फायदा झाला, जो रुटचा खुलासा
-टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ‘या’ राष्ट्रीय संघाने चक्क मुंबई संघाला दिले आमंत्रण
-भारतातील असे ३ क्रिकेट स्टेडियम; जिथे १० वर्षांपासून झाला नाही एकही सामना