भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने (MS Dhoni) ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण असे असले तरी खूप कमी जणांना माहित आहे की, धोनी डिसेंबर २०१४ मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यावेळी रवी शास्त्री (Ravi Shastri) भारतीय संघाचे मॅनेजर होते. धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराटने जानेवारी २०१५ पासून नियमित कसोटी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली. आता माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी धोनीच्या कसोटी निवृत्तीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
शास्त्रींच म्हणणं आहे की, हे सगळं खूप घाई गडबडीत झालं. खेळाडू आधीच चांगल्या मनस्थितीत नव्हते. धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मध्येच कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर विराट कोहलीला कसोटीचा कर्णधार बनवण्यात आलं होतं.
साल २०१४ मध्ये संघाचे मॅनेजर असणाऱ्या रवी शास्त्रींनी स्टार स्पोर्ट्सवर खुलासा केला. त्यांना धोनी म्हणाला होता की त्याला संपूर्ण संघाला एकत्र बसून काहीतरी सांगायचं आहे आणि धोनीच्या या निर्णयामुळे खेळाडूंना धक्काच बसला. धोनी तेव्हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत होता.
रवी शास्त्री पुढे म्हणाले, “धोनीला माहित होतं की, आपण आता कर्णधारपद सोडून निवृत्त होऊन ते विराट कोहलीकडे दिलं पाहिजे. धोनीला पुढचा कर्णधार कोणाला बनवावं, हे माहीत होतं. तो फक्त कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची योग्य वेळेची वाट पाहत होता. त्याला माहित होतं तो किती खेळू शकतो आणि मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याला अजून खेळायचं होतं.”
अधिक वाचा – ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या ४ गोष्टी
धोनीने नंतर कसोटीसारखचं २०१७ साली मर्यादित षटकांच्या संघांचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) सगळ्या क्रिकेटच्या प्रकरांमधला भारताचा कर्णधार बनला.
गेल्या काही वर्षात धोनी आणि कोहलीमध्ये एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं. या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचे अनेकदा दिसून आले. रवी शास्त्री संघाच्या मॅनेजर नंतर मुख्य प्रशिक्षक बनले. नुकताच नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“वनडे आणि कसोटी संघासाठी वेगवेगळे कर्णधार असणे योग्य”, रवी शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया
गांगुली की धोनी? सर्वोत्तम कर्णधाराच्या प्रश्नावर भज्जी म्हणाला…
विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय ते मेरी कोम-ऑलिम्पिक, २०२१ वर्षात भारतीय क्रीडाविश्वात गाजले हे १० वाद
व्हिडिओ पाहा – आख्खा भारत रडत होता, पण त्या दिवशी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय वातावरण होते?
https://www.youtube.com/watch?v=QB086wgQb1E