जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेअगोदर भारतीय संघाला तीन आठवड्यांचा ब्रेक दिलेला आहे. याचा आनंद घेण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू आपापल्या परिवारासोबत इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यास गेले आहेत. जास्ती तर खेळाडू लंडनच्या जवळपासच्या ठिकाणी फिरायला गेले आहेत. तर काही खेळाडू ग्रामीण ठिकाणी फिरायला गेले आहेत.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा देखील इंग्लंड दौऱ्यावर असून तोदेखील ग्रामीण ठिकाणी परिवाराससोबत फिरण्यास गेला आहे. याच दरम्यानचा एक व्हिडिओ इशांत शर्माने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
पत्नीसोबत ईशांत शर्मा घेतोय सुट्टीचा आनंद
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने आपली पत्नी प्रतिमासोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये इशांत शर्मा आणि पत्नी प्रतिमा हे दोघेही डोंगरावरुन वाहणाऱ्या नैसर्गिक पाण्यात अर्थात धबधब्याखाली अंघोळ करताना दिसत आहे. या अनोख्या धबधब्याखाली भिजताना या दोघांची बॉन्डिंग खूप छान दिसून येत होते. या दरम्यान ईशांतच्या उजव्या हाताच्या बोटाला झालेल्या जखमेला पाण्यापासून वाचवतानाही दिसला. ही दुखापत ईशांत शर्माला जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात दरम्यान झाली होती.
जंगलामध्ये होता नैसर्गिक धबधबा
सेंट नेक्टन ग्लेन हे यूकेमधील सर्वात आध्यात्मिक ठिकाणी असल्याचे मानले जाते. उत्तर कॉर्नवॉलमध्ये असलेली ही जागा दाट जंगलाच्या स्वरूपात व्यापली आहे. डोंगराच्या एका छिद्रातून येणारा ६० फूट धबधबा सर्वांना त्याकडे आकर्षित करून घेतो. इथल्या जंगलात अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी देखील आढळतात. येथे खाजगी रिसॉर्ट्सदेखील आहेत.
कोरोनाचा प्रभाव असला तरी सुरू राहतील सुट्ट्या
इंग्लंडच्या काही खेळाडूंना आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच इंग्लंडचा एकदिवसीय संघ घाईघाईने विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. परंतु पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना देण्यात आलेल्या ब्रेकबाबत देखील बीसीसीआयने कोणतेही बदल केलेले नाहीत. भारतीय संघाला तीन आठवड्यांचा ब्रेक तसाच सुरू राहणार आहे. इंग्लंड संघाला पाकिस्तानविरुद्ध 8 जुलैपासून एकदिवसीय मालिका खेळायची आहे.
अंतिम सामन्यात खराब झाली ईशांतची गोलंदाजी
जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना 18 जून ते 23 जून दरम्यान पार पडला. या अंतिम सामन्याच्या पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातल्याने एकही चेंडू न टाकता सामना रद्द झाला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खराब वातावरणामुळे सामना लवकर संपवण्यात आला होता. या अंतिम सामन्याचा निकाल सहाव्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी लागला.
या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून दुसऱ्या डावांमध्ये न्यूझीलंड संघाला फक्त 139 धावांचे लक्ष देण्यात आले होते जे न्यूझीलंड संघाने आठ विकेट राखून पूर्ण केले. अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा काइल जैमीसनला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला. याच अंतिम सामन्यात ईशांत शर्माने पहिल्या डावांमध्ये तीन बळी घेतले. तर दुसऱ्या डावात त्याला एकही फलंदाजाला बाद करण्यात यश मिळाले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘दादा’ला गोलंदाजी करणारा क्रिकेटर पोटासाठी करतोय मरमर, रस्त्यावर दाळपूरी विकण्याची आली वेळ
टी२०त ५ शतके झळकावणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरची कारकिर्द संपुष्टात! मिळाला निवृत्तीचा सल्ला
मोठी बातमी! श्रीलंकेच्या २९ खेळाडूंचा भारताविरुद्ध खेळण्यास होकार, ‘या’ क्रिकेटरने घेतली माघार