ऑस्ट्रेलियात सुरू असणारा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup)जसजसा समाप्तीकडे चालला आहे, तसतसे सामन्यांचे निकाल रंजक लागत आहेत. आता भारत विरुद्ध बांगलादेश (INDvBAN) सामन्याचा निकालच पाहा. बुधवारी (2 नोव्हेंबर) या दोन्ही संघात ऍडलेडच्या ओव्हलवर सुपर 12चा 35 सामना खेळला गेला. यावेळी या सामन्याच्या विजयाचे माप कधी भारताच्या तर कधी बांगलादेशच्या बाजूने झुकत होते. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार अवघ्या 5 धावांनी विजय मिळवला.
या थरारक सामन्यात भारताला 16व्या षटकात 20 धावांचा बचाव करायचा होता. यावेळी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्याऐवजी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh)याच्यावर विश्वास दाखवला. अर्शदीपनेही कर्णधाराचा विश्वास कायम राखत 14 धावा खर्च केल्या.
अर्शदीप गोलंदाजी करत होता तेव्हा तस्कीन अहमद याने त्याच्या उत्तम यॉर्करवर एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर नुरूल हसन याने खणखणीत षटकार खेचला. तेव्हा भारत सामना हरणार की काय असे असताना तिसरा चेंडू निर्धाव राहिला. यामुळे 3 चेंडूमध्ये 13 धावा असे समीकरण झाले.
त्यातच षटकातील चौथ्या चेंडूवर केएल राहुल (KL Ragul) याची फलंदाजाला धावबाद करण्याची संधी मुकली आणि बांगलादेशने 2 धावा घेतल्या. पाचव्या चेंडूवर चौकार मिळाल्याने शेवटच्या चेंडूवर सामना बरोबरीत करण्यासाठी बांगलादेशला षटकाराची आवश्यकता होती, मात्र नुरूल हसन (Nurul Hasan) याने एक धाव घेतली आणि भारत जिंकला. हे षटक अर्शदीपने ज्याप्रकारे टाकले ते उत्तम ठरले. Arshdeep Singh Aeroplane Celebration
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. भारताने 20 षटकात राहुल आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीमुळे 6 विकेट्स गमावत 184 धावसंख्या उभारली. राहुलचे हे या स्पर्धेतील पहिलेच अर्धशतक ठरले. त्याने 32 चेंडूत 50 धावा केल्या. दुसरीकडे विराटने या स्पर्धेत तिसरे अर्धशतके केले. त्याने या सामन्यात 44 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने स्फोटक सुरूवात केली. त्यांनी पहिल्या 7 षटकातच एकही विकेट न गमावता 66 धावा केल्या, मात्र पावसाने त्यांचा खेळ खराब केला. सामना 16 षटकात 151 धावसंख्या असा करण्यात आला. पावसानंतर सामना सुरू झाला तेव्हा 8 ते 16 या षटकांदरम्यान भारताकडून मोहम्मद शमी याने एक, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: पराभवानंतर बांगलादेशची रडारड! विराटवरच लावला ‘फेक फिल्डींग’चा आरोप; म्हणाले, ‘त्या 5 धावा…’
पाकिस्तानसाठी दुष्काळात तेरावा महिना, ‘हा’ स्फोटक फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातून बाहेर