आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाच्या खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात कसल्याही प्रकारची सूट न देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा होतो की, या दोन्ही संघांचे खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या आठवड्यात खेळू शकणार नाहीत. ENG-AUS Players Will Never Be Part Of Few IPL Matches
ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. या दोन्ही संघांमध्ये ४ सप्टेंबरपासून ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. ही मालिका आज (८ सप्टेंबर) संपेल. तर, लगेच ११ सप्टेंबरपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. १६ सप्टेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्याने ही मालिका समाप्त होईल. त्यानंतर लगेच १७ सप्टेंबरला या दोन्ही संघांचे आयपीएलमध्ये सहभागी असणारे खेळाडू युएईला रवाना होतील.
आयपीएल गव्हर्निंग काउंसिलच्या सूचनांनुसार त्यांना युएईला पोहोचल्यानंतर ६ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येईल. अर्थात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जवळपास २४ सप्टेंबरपर्यंत आयपीएलमध्ये खेळताना न दिसण्याची शक्यता आहे.
क्वारंटाइनच्या कालावधीदरम्यान या सर्व खेळाडूंची २-३वेळा कोरोना चाचणी करण्यात येईल. या चाचणीत खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आपापल्या संघात सामील होण्याची संधी मिळेल.
स्टिव्ह स्मिथ, जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर, बेन स्टोक्स, ग्लेन मॅक्सवेल असे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचे जवळपास २१ खेळाडू यंदा आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांचा भाग आहेत. एवढेच नव्हे तर, वॉर्नर आणि स्मिथ उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या संघांना सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये नव्या कर्णधाराची निवड करावी लागणार आहे. कारण, वॉर्नर हा यंदा आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद आणि स्मिथ हा राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-“डीआरएस घेणार नाही, काळजी करू नको,” धोनीचा मजेदार व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
-गब्बर म्हणतो, आता केवळ ज्युनिअरचं नव्हे तर सिनियर खेळाडूही घेणार ‘या’ खेळाडूकडून धडे
-ब्रॉड म्हणतो, या इंग्लंडच्या क्रिकेटरला वनडेत तोड नाही!
ट्रेंडिंग लेख-
-रोहित-धोनी नव्हे तर ‘हे’ ३ क्रिकेटर्स आयपीएल २०२०मध्ये पटकावतील सर्वाधिक षटकार मारण्याचा अवॉर्ड
-विराटच्या आरसीबीला पराभवाची धूळ चारण्यासाठी हैद्राबादचा वॉर्नर उतरेल ‘या’ ११ शिलेदारांसह
-लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!