मागील अनेक महिन्यांपासून भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी अफलातून होत आहे. नुकत्याच बांगलादेश विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना 14 विकेट्स घेतल्या. या सामन्यात भारताने 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला.
भारताच्या या गोलंदाजांच्या यशामागील गुपित सांगताना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने सांगितले की सर्वजण एकमेकांच्या यशाचा आनंद घेतो. तसेच एकमेकांशी चर्चा करत असतो. त्याचा गोलंदाजांना फायदा झाला आहे.
सामना संपल्यानंतर इशांत म्हणाला, ‘आम्ही नेहमीच एकमेकांच्या यशाचा आनंद घेत असतो. एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आमच्या योजनांबद्दल आम्ही एकमेकांशी चर्चा करतो.’
‘शमीच्या गोलंदाजीचा उल्लेख करणे कठीण आहे. मी थोडा कमी खेळलो आहे. मी 31 वर्षांचा आहे (हसून म्हणाला) मी वेगवेगळ्या शैलींनी खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच शमी गुलाबी चेंडूने याआधी खेळला आहे, म्हणून त्याच्याकडून काही टिप्स घेण्याची गरज आहे,’ असेही इशांत म्हणाला.
तसेच मोहम्मद शमी म्हणाला, ‘आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही एकमेकांच्या यशाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. मी इशांत आणि उमेशबरोबर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. हे माझ्यासाठी गोष्टी सुलभ करते.’
दुसरीकडे या सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या उमेश यादवने सांगितले की, मला त्याच्या सामर्थ्याबद्दल माहिती आहे आणि यामुळे त्याला गोलंदाज म्हणून सुधारण्यास खूप मदत झाली आहे.
हा दिग्गज करणार राजस्थान रॉयल्सचे २०२० आयपीएलमध्ये नेतृत्व
वाचा- https://t.co/91Gt0vNnnv#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi
— Maha Sports (@Maha_Sports) November 17, 2019
दिवस-रात्र कसोटीत अशा अनोख्या पद्धतीने गुलाबी चेंडू दिला जाणार कर्णधार कोहलीकडे
वाचा- ????https://t.co/xOA7Aes3YD????#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 17, 2019