इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान मँचेस्टर येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला असल्याने हा सामना निर्णय ठरेल. जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी भारतीय संघात मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली. त्याने या सामन्यात दोन बळी मिळवत चांगली सुरुवात केली. त्यानंतर आपल्या दुसऱ्या स्पेलमध्येही तुफानी गोलंदाजी करत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला अडचणीत आणले.
सिराजची शानदार सुरुवात
पहिल्या दोन सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केलेल्या जसप्रीत बुमराहला सामन्याआधी किरकोळ दुखापत झाल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. त्याच्याजागी मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले गेले. त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. आपल्या पहिल्या षटकात त्याने जॉनी बेअरस्टो व जो रूट यांना एकही धाव न करू देता तंबूत पाठवले. त्यामुळे इंग्लंडचा संघ २ बाद १२ अशा अडचणीत सापडला.
https://twitter.com/SoniGup46462554/status/1548637708675084288?t=c8GzNlnbEgB_7Mwg3idpOw&s=19
दुसऱ्या स्पेलमध्ये बटलरला टाकले अडचणीत
आपल्या पहिल्या स्पेलमध्ये चार षटके टाकल्यानंतर सिराज १९ व्या षटकात पुन्हा गोलंदाजीसाठी आला. यावेळी त्याच्यासमोर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर उभा होता. सिराजने या षटकातील आपला तिसरा चेंडू थेट बटलरच्या हेल्मेटवर मारला. त्यामुळे इंग्लंडच्या फिजोओला मैदानात यावे लागले. त्यानंतर दोन चेंडूनंतर पुन्हा एकदा तसाच वेगवान बाऊन्सर मारला. मात्र, दोन्ही वेळी चेंडू हेल्मेट वर लागल्याने बटलर बालबाल बचावला. विशेष म्हणजे सिराजने लगेच त्याच्यापाशी जात त्याची विचारपूस करून खिलाडूवृत्ती दाखवली. संघ अडचणीत असताना जोस बटलरने एकाकी लढा देत इंग्लंडसाठी अर्धशतक ठोकले. इंग्लंडने ३४ षटकात १८० पर्यंत मजल मारलेली.
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटच्या निर्णायक वनडे सामन्यात नशीब भारताच्या बाजूने, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय
भारत-पाकिस्तान ३१ जुलैला येणार आमने-सामने, वाचा कधी आणि कुठे रंगणार सामना
तू चुकतोय; कर्णधार रोहित शर्माच्या ‘या’ निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटरने मुरडले नाक