भारत आणि इंग्लंड संघात ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. परंतु, या मालिकेपूर्वी भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. काही दिवसांपूर्वी सराव सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खानला दुखापत झाली होती. त्यांच्या अगोदर जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर सलामीवीर शुभमन गिलला दुखापत झाली होती. त्यामुळे हे तिन्ही खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत.
त्याचबरोबर आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कसोटी सामन्यात रोहित शर्मा सोबत सलामीवीर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार असलेला मयंक अगरवाल देखील जखमी झाला आहे. सोमवारी (२ ऑगस्ट) सरावादरम्यान त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटीमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता सर्वांना हा प्रश्न पडला आहे की, सलामी फलंदाज म्हणून मैदानात कोण उतरेल?
याच संदर्भात माजी दिग्गज खेळाडू लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात सलामीला रोहित शर्मा खेळेल, हे जवळपास निश्चित आहे. पण त्याच्याबरोबर पहिल्या कसोटीमध्ये कोण सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरले पाहिजे, याबद्दल त्यांनी मत मांडले आहे. त्यांनी यासाठी केएल राहुल सर्वोत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे.
पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जाणार आहे. त्याच दरम्यान गावस्कर यांनी चेतेश्वर पुजाराला एक सल्ला दिला आहे. ते म्हणले की, चेतेश्वर पुजाराने आपला खेळ बदलण्याचा विचार करू नये आणि तो ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळतो त्याच पद्धतीने आता ही खेळले पाहिजे.
एएनआयशी बोलताना गावस्कर म्हणाले की, “सराव सामन्यात केएल राहुलने शतक ठोकले, मला वाटते की त्याने पहिल्या कसोटीत भारतासाठी डावाची सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे केएल राहुलचा आत्मविश्वास ही वाढेल, कारण त्याने सराव सामन्यात शतक झळकावलेे आहे. त्यामुळे मला वाटते की त्याने सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरले पाहिजे.”
गावस्कर पुजाराबद्दल म्हणाले की, “मला वाटते की पुजाराने त्याच्या खेळण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवला पाहिजे, जर संघ त्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवत नसेल, तर त्याच्या जागी दुसरे कोणीतरी असावे. परंतु, त्याची हीच पद्धती भारतासाठी आणि त्यांच्यासाठी उपयोगी पडेली आहे. त्याने एक टोक सांभाळून ठेवले आहे. तर बाकीचे फलंदाज दुसऱ्या टोकापासून आपले फटके खेळू शकतो, कारण त्यांना माहित आहे की तो दुसऱ्या टोकाला उभा आहे.”
त्याचबरोबर सुनील गावस्कर यांनी बेन स्टोक्सने क्रिकेटपासून ब्रेक घेण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. गावस्कर म्हणाले की, “बेन स्टोक्स इंग्लंडसाठी फलंदाजी आणि गोलंदाजी करत खेळ बदलणारा खेळाडू आहे. या मालिकेत त्याने न खेळणे हा भारतासाठी खूप मोठा फायदा आहे. इंग्लंड संघ जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स यांच्याशिवाय कमकुवत दिसून येत आहे.”
इंग्लंड आणि भारत संघात होणाऱ्या या मालिकेने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या दुसरा पर्वाला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे’ धुरंदर अष्टपैलू घेऊ शकतात स्टोक्सची जागा, आजवर केली आहे अप्रतिम कामगिरी
“जे पंतने केले ते गांगुलीनेही कधी केले नव्हते”, जेम्स अँडरसन झाला प्रभावित
पहिल्या प्रयत्नात १९.९९ चा थ्रो, नंतर सलग दोन फाऊल; तजिंदरपाल सिंग पडला ऑलिंपिकमधून बाहेर