रांचीमध्ये रविवारी (9 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना सामना 7 विकेट्सने जिंकला. यामुळे तीन सामन्याची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. या विजयामध्ये श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी महत्वाची भुमिका पार पाडली. यावेळी श्रेयसने नाबाद शतकी खेळी करत विराट कोहली याच्या विशेष यादीत प्रवेश केला आहे.
रांचीमध्ये भारताचा विक्रम पाहिला तर 2014 नंतर प्रथमच संघाने येथे वनडे सामना जिंकला आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्याने 111 चेंडूत नाबाद 113 धावा केल्या. यामुळे तो रांचीमध्ये वनडेत शतक करणारा चौथा खेळाडू आणि दुसरा भारतीय ठरला आहे. त्याच्याआधी विराट कोहली याने येथे दोन शतके झळकावली आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा आणि श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूज यांनीही रांचीमध्ये वनडे सामन्यात शतके केली आहेत.
विराटने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 139 (126) धावांची खेळी केली होती. त्याच सामन्यात मॅथ्यूजनेही नाबाद 139 धावा केल्या होत्या. तो सामना भारताने 3 विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर विराटने 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 123 धावा केल्या होत्या, मात्र तो सामना भारताने 32 धावांनी गमावला होता. त्या सामन्यात उस्मान ख्वाजने 104 धावा केल्या होत्या.
श्रेयसने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतकी खेळी करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.
1⃣1⃣3⃣* runs
1⃣1⃣1⃣ balls
1⃣5⃣ foursA game-changing knock from @ShreyasIyer15 as he bags the Player of the Match award! ????????#TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/7kjHzj9MqW
— BCCI (@BCCI) October 9, 2022
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी रीझा हेंड्रिक्स-एडन मार्क्रम यांच्या 129 धावांच्या भागादारीच्या जोरावर 50 षटकात 7 विकेट्स गमावत 278 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना किशन-अय्यर जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 155 चेंडूत 161 धावांची भागीदारी रचली. किशनने 93 आणि श्रेयस अय्यर याने नाबाद 113 धावा केल्या. तसेच संजू सॅमसन 30 धावा करत नाबाद राहिला.
या मालिकेतील तिसरा आणि मालिका निर्णायक सामना 11 ऑक्टोबर दिल्ली येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: रांची वनडेत इशानला भेटली आजी, तर शार्दुलला मिळाले पत्र! पाहाच तो खास व्हिडिओ
टीम इंडियाचा नाद करायचा नाय! आव्हानाचा पाठलाग करताना ‘इतक्यांदा’ मिळवलाय विजय, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड लांबच