भारतीय क्रिकेट संघातून बराच काळ बाहेर असणारा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने मोठे वक्तव्य केले आहे. पार्थिवने सध्या भारतीय टी२० विश्वचषक संघाचा भाग असणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि रिषभ पंतपैकी कोण टी२० विश्वचषकात खेळण्यासाठी अधिक योग्य आहे, हे सांगितले आहे. Pant Or Rahul Parthiv Patel said that who can be the perfect wickwtkeeper for the world cup.
फॅन कोडच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला की, “टी२० विश्वचषकासारख्या वेगवान क्रिकेटसाठी केएल राहुल हा पंतपेक्षा योग्य असेल. मला वाटते की, टी२० विश्वचषकासाठी राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी देणे ही दिलासादायक गोष्ट असेल. तो विश्वचषकाची सुरुवात होईपर्यंत पूर्णपणे तयार होईल.”
पंतविषयी बोलताना पार्थिव म्हणाला की, “जेव्हा मी १७-१८ वर्षांचा होतो. तेव्हा काही मालिकेत माझी कामगिरी खूप वाईट होती. त्यामुळे मी परत देशांतर्गत क्रिकेट संघात गेलो होतो आणि तिथे मला खूप फायदा झाला होता. मी जेव्हाही पंतला भेटतो तेव्हा त्याला सांगत असतो की, लोक तुझ्याविषयी बोलत असतात. कारण तुझ्यामध्ये ती प्रतिभा आहे. जर तुझ्यामध्ये तेवढी प्रतिभा नसती तर लोकांनी तुला एवढे महत्त्व दिले नसते. हे नेहमी डोक्यात ठेवत जा. अनेकदा आपल्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करुन परत आपली लय मिळवावी लागते.”
एमएस धोेनीचा पर्यायी खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या पंतला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली आहे. हा युवा फलंदाज यष्टीपुढे आणि यष्टीमागे दोन्हीकडे पारंगत आहे. मात्र, २०१९मधील न्यूझीलंड दौऱ्यावर राहुलने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती आणि चांगले कामही केले होते.
त्यामुळे भारतीय टी२० विश्वचषक संघात धोनीला घेण्यात आले नाही तर यष्टीरक्षणाची जबाबदारी राहुलकडे सोपवली जाईल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
चेन्नई किंग्ज याच दिवशी ३ वर्षांपुर्वी खऱ्या अर्थाने मुंबई…