2018-19 साली भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात मालिकेत 2-1 या फरकाने पराभूत केले होते आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर अनुपस्थित होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दोन वर्षापूर्वी भारताकडून झालेला हा पराभव अजूनही विसरला नाही.
चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचे आव्हान
मिचेल स्टार्क ईएसपीएनच्या ‘द क्रिकेट मंथली’ या कार्यक्रमात म्हणाला, “आगामी चार सामन्याच्या कसोटी मालिकेत आमच्या संघाकडे सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मागील चुकांमध्ये सुधारणा करण्याची संधी असणार आहे.”
मिचेल स्टार्क म्हणाला, “तुम्हाला कधी मालिका गमवावे, असे वाटत नाही आणि तुम्ही ऑस्ट्रेलियात तर कधीच मालिका गमावू शकत नाही. भारताने त्या पूर्ण मालिकेत (2018-19) फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये आमच्यापेक्षा चांगले प्रदर्शन केले होते. आम्ही या सत्यापासून दूर पळू शकत नाही. आम्हाला खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करावी लागेल आणि या मालिकेत निश्चितच चुका सुधारण्याची संधी असेल.”
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया सोबत चार सामन्यांची कसोटी मालिका 17 डिसेंबर पासून खेळणार आहे. यावेळी डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघेही या मालिकेत उपस्थित असणार आहेत. त्यामुळे भारतासाठी ही मालिका आव्हानात्मक राहणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना खेळून विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्यामुळे उर्वरीत सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करताना दिसेल.
संबधित बातम्या:
– भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून स्टिव्ह स्मिथ बाहेर? या कारणामुळे अर्ध्यातून सोडले सराव सत्र
– नव्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीयांची बल्ले-बल्ले; सहा खेळाडू टॉप टेन मध्ये
– अब आयेगा मजा! रोहित झाला ऑस्ट्रेलियाला रवाना; खेळणार इतके कसोटी सामने