आयपीएल २०२२ च्या ६२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात लढत झाली. चेन्नईचा सलामीवीर डेवॉन कॉनवे स्वस्तात बाद झाला, पण दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने मात्र संघाचा चांगली सुरुवात दिली. मुंबईचे वानखडे स्टेडियम म्हणजे एकप्रकारे भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचे होम ग्राउंड. पण ऋतुराजने सचिनच्या याच होम ग्राउंडवर त्याचा एक खास विक्रम मोडीत काढला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी (MD Dhoni) या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड चालू हंगामाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरताना दिसला होता, पण स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसा तो फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात त्याने ४९ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५३ धावा केल्या आणि संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. परंतु डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला डेवॉन कॉनवे मात्र ९ चेंडूत अवघ्या ५ धावा करून बाद झाला. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानाव १३३ धावा केल्या.
या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएलच्या सुरुवातीच्या ३५ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने या विक्रमात दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या पहिल्या ३५ आयपीएल डावांमध्ये ११७० धावा केल्या होत्या, तर ऋतुराजने मात्र पहिल्या ३५ डावांमध्ये १२०५ धावा केल्या आहेत. या यादीत रिषभ पंत १०८५ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे, ज्याने पहिल्या ३५ आयपीएल इनिंग्जमध्ये १०४९ धावा केल्या होत्या.
आयपीलच्या पहिल्या ३५ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१२०५ – ऋतुराज गायकवाड
११७० – सचिन तेंडुलकर
१०८५ – रिषभ पंत
१०४९ – सुरेश रैना
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऋतुराजने सचिनच्या अशाच एक महत्वाचा विक्रमाची बरोबरी केली होती. आयपीएलमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋतुराजने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होत. दोघांनीही अवघ्या ३१ डावांमध्ये १००० आयपीएल धावांचा टप्पा पार केला होता आणि दोघेही संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तीन युवा भारतीय खेळाडू, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत मिळू शकते संधी
मोठी बातमी! भारताची सुवर्ण इतिहासाला गवसणी, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’