भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील पहिला टी20 सामना खेळला गेला. मुंबईमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने केवळ 2 धावांनी विजय मिळवला. ईशान किशन (Ishan Kishan) याने चांगली सुरुवात करुन देऊनसुद्धा संघाने पहिल्या तीन विकेट्स केवळ 46 धावसंख्येवरच गमावल्या. कारण शुबमन गिल ज्याचे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण झाले, मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन हे तिघेही एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतले. त्यातील संजूच्या प्रदर्शनावर भारताच्या दिग्गजाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
संजू सॅमसन (Sanju Samson) याला संघात संधी दिली नाहीतर चाहते मोठ्या प्रमाणात नाराज होतात. त्याचे आणि चाहत्यांचे एक भावनिक नाते तयार झाले आहे. तो क्रिकेटच्या या छोट्या प्रकारात भारताच्या अंतिम अकरामध्ये जवळपास पाच महिन्यांनी परतत होता. यामुळे तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा असताना तो 6 चेंडू खेळून बाद झाला. यावेळी त्याला एक जीवनदानही मिळाले. तो 5 धावा करत धनंजया डी सिल्व्हा याचा शिकार ठरला.
भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर हे भारत-श्रीलंका मालिकेच्या समालोचनाचे एक भाग आहेत. संजू बाद होताच ते म्हणाले, आताच्या चेंडूने त्याची कड घेतली आणि तो थर्ड मॅनच्या दिशेने गेले. तो एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या फलंदाजीचे कौशल्यही उत्तम असून कधी-कधी तो खराब शॉट खेळतो. त्याचे शॉट सिलेक्शन चांगले नाही.
संजूने फलंदाजीत तर निराश केलेच तसेच त्याने क्षेत्ररक्षणातही वाईट कामगिरी केली. त्याने श्रीलंकेच्या डावातील पहिल्याच षटकात कुशल मेंडिसचा सोपा झेल सोडला. हार्दिक पंड्या ते षटक टाकत होता. त्याच्या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मेंडिसने शॉट खेळला. जो मिडऑफवर उभ्या असलेल्या संजूने हवेत सूर मारत पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला अपयश आले.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा टी20 सामना 5 जानेवारीला पुणे येथे खेळला जाणार आहे. (Sunil Gavaskar criticize Sanju Samson INDvSL first T20)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रेयसला कर्णधार बनवण्यासाठी आणखी एक माजी क्रिकेटपटू आग्रही; म्हणाला…
थर्ड अंपायरच्या निर्णयावर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भडकले, घडलेला प्रकार पाहाच