नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.
पाचव्या दिवशी १ विकेट बाकी असताना यापुर्वी १० कसोटी सामने झाले आहेत. त्यात १०पैकी १० वेळा फलंदाज करणारा संघ पराभूत झाला होता.
१९६७-६८मध्ये भारतीय संघ पाचव्या दिवशी १ विकेट बाकी असताना आॅस्ट्रेलियामध्ये पराभुत झाला होता. पाचव्या दिवशी भारत जेमतेम १५ धावा करु शकला होता.
शेवटच्या दिवशी १ विकेट बाकी असताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आॅस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध १९८२-८३ला ३३ धावा केल्या होत्या परंतु त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते.
There are ten previous instances of team finishing a day nine down in the 4th inngs and the batting team went on to lose all ten instances. Most recent one in Durban this March. #ENGvIND pic.twitter.com/5Bt0Rm5EHp
— Deepu Narayanan (@deeputalks) August 22, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम
–केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी
–सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?