सन 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवड समितीने मधल्या फळीत विजय शंकर आणि रिषभ पंत या नवोदित खेळाडूंचा समावेश होता, तर अनुभवी अंबाती रायडूला निवडकर्त्यांनी संधी दिली नव्हती. निवडकर्त्यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध झाला होता. मात्र, आता बीसीसीआयचे माजी संघ निवडकर्ता देवांग गांधी यांनी याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
उपांत्य सामन्यातील पराभवामुळे संघ निवडकर्त्यांवर चाहत्यांनी ओढले ताशेरे
भारतीय क्रिकेट संघाने सन 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. चांगल्या कामगिरीनंतरही या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आलं होतं. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यामुळे चाहत्यांनी निराश होऊन संघ निवडकर्त्यांवर या पराभवाचे ताशेरे ओढले होते.
होय, तो निर्णय चुकीचा – देवांग गांधी
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राशी बोलताना माजी क्रिकेटपटू आणि निवडकर्ता देवांग गांधी म्हणाले की, सन 2019 मधील विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघात रायडूची निवड न करणे हा चुकीचा निर्णय होता.
याबद्दल बोलताना गांधी म्हणाले की, हो रायडूची निवड न करणे ही आमची चूक होती. शेवटी आपणही माणूस आहोत. त्यावेळी असे वाटत होते की आम्ही योग्य संघ निवडला आहे. पण नंतर असे जाणवले की रायडू संघात असता तर त्याची संघाला मदत मिळाली असती. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने फक्त एक दिवस खराब कामगिरी केली आणि रायडूची अनुपस्थिती हा मोठा मुद्दा बनला. मी रायडूने दिलेली प्रतिक्रिया समजू शकतो.
अंबाती रायडूने घेतली होती निवृत्ती
विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघात निवड न झाल्याने अंबाती रायडूने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर काही काही दिवसांनंतर त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता.
रायडू ऐवजी विजय शंकरला दिली होती संधी
रायडूऐवजी अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. पंत उपांत्य सामन्यात खराब फटका खेळून तो बाद झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माचे माजी दिग्गजाला चोख प्रत्युत्तर; म्हणाला…
बुम बुम इझ बॅक! ४० वर्षीय आफ्रिदी पुन्हा बनला कर्णधार
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बाऊचरचा खुलासा, ‘मला कोरोना झाल्याची कल्पनाच नव्हती’
ट्रेंडिंग लेख –
वडिलांचं निधन झाल्यावरही देशासाठी मैदानावर लढलेले ३ भारतीय क्रिकेटर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात