पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज (pakistan vs west indies) यांच्यात गुरुवारी (१६ डिसेंबर) टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. उभय संघातील तिसरा टी-२० सामना कराचीमध्ये खेळला गेला असून पाकिस्तानने या सामन्यात ७ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने टी-२० मालिकेत ३-० अशा फरकाने विजय मिळवला आहे. दरम्यान, टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात जेव्हा पाकिस्तान संघ गोलंदाजी करत होता, त्यावेळी एक गमतीशीर प्रसंग पाहायला मिळाला. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिजच्या डावाच्या आठव्या षटकात पाकिस्तानचा मोहम्मद नवाझ (mohammad nawaz) गोलंदाजीसाठी आला. षटकातील पहिल्या चेंडूवर शामर ब्रोक्सने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील ब्रोक्स मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता, पण हा चेंडू मैदानाबाहेर जाऊ शकला नाही. यावेळी हा चेंडू मैदानावर क्षेत्ररक्षण करत असेलल्या मोहम्मद हसनैन (mohammad hasnain) आणि इफ्तिकार एहमद (Iftikhar Ahmed) यांच्या दिशेने आला. परंतु या दौघांपैकी एकही खेळाडू हा झेल घेऊ शकला नाही. दोघेही झेल घेण्यासाठी एकमेकांच्या आशेवर राहिले आणि परिणामी चेंडू दोघांच्या समोरून जाऊन मैदानावर पडला.
तिसऱ्या टी-२० सामन्यातील या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओला प्रचंड लोकप्रीयता मिळत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ पाहून शोएब मलिक आणि सईद अजमल यांची आठवण आली आहे.
"Mine!"
"No mine!"
"Okay yours!"
"No its yours!!!!"
LIVE COMMS:
???? https://t.co/kq8iBCQ4E6????#PAKvWI|#WIvPAKpic.twitter.com/UJ9f7jyHOH— ????Flashscore Cricket Commentators (@FlashCric) December 16, 2021
मोहम्मद हसनैन आणि इफ्तिकार एहमद यांनी या सामन्यात ज्याप्रकारे हा सोपा झेल सोडला, अगदी त्याच प्रकारे अजमल आणि मलिकने देखील झेल सोडला होता. अजमल आणि मलिकला त्यांनी काही वर्षांपूर्वी सोडलेल्या या झेलमुळे अजूनही सोशल मीडियावर ट्रॉल केले जाते. या दोघांचे वेगवेगळे मिम्स देखील व्हायरल होत असतात. अशात हसनैन आणि इफ्तिकार यांनी सोजलेला हा झेल देखील चर्चेत येणार यात शंका नाही.
"Mine!"
"No mine!"
"Okay yours!"
"No its yours!!!!"
LIVE COMMS:
???? https://t.co/kq8iBCQ4E6????#PAKvWI|#WIvPAKpic.twitter.com/UJ9f7jyHOH— ????Flashscore Cricket Commentators (@FlashCric) December 16, 2021
दरम्यान, गुरुवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना तीन विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. वेस्ट इंडीजने दिलेले लक्ष्य मोठे असले, तरी पाकिस्तानने सात विकेट्स राखून ते गाठले. पाकिस्तानने लक्ष्याचा पाठलाग करताना १८.५ षटकात आणि तीन विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य पार केले.
पाकिस्तानसाठी या सामन्यात सलामीवीर मोहम्मद रिजवानने ४५ चेंडूत सर्वाधिक ८७ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच या संपूर्ण मालिकेतील रिजवानचे प्रदर्शन पाहिले तर ते देखील अप्रतिम होते, यासाठी त्याला मालिकावीर पुरस्कार देखील देण्यात आला.
महत्वाच्या बतम्या –
सचिन, विराटनंतर रोहित बनला ‘अलिबागकर’, कोट्यवधींमध्ये पैसा ओतत पत्नीच्या नावे विकत घेतली जमीन!