संपुर्ण नाव- लक्ष्मीपथी बालाजी
जन्मतारिख- 27 सप्टेंबर, 1981
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई), तमिळनाडू
मुख्य संघ- भारत, अल्बर्ट टीयुटीआय पॅट्रीओट्स, चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकात नाईट रायडर्स आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 8 ते 12 ऑक्टोबर, 2003
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 18 नोव्हेंबर, 2002
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 11 सप्टेंबर, 2012
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 8, धावा- 51, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 8, विकेट्स- 27, सर्वोत्तम कामगिरी- 5/76
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 30, धावा- 120, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 30, विकेट्स- 34, सर्वोत्तम कामगिरी- 4/48
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 5, धावा- 0, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 5, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 3/19
थोडक्यात माहिती-
-तमिळनाडूतल्या लक्ष्मीपथी बालाजीला त्याची मुळ तमिळ भाषा सोडूनही दुसऱ्या अनेक भाषा बोलता येतात. तो हिंदी, इंग्रजी, मल्याळम खूप सराईतपणे बोलू शकतो.
-बालाजी त्याच्या बालवयात खूप खोडकर मुलगा होता. त्याला लहानपणी नेहमी छोट्यामोठ्या दुखापती होत असत.
-असे म्हटले जाते की बालाजी नेहमी हसत असतो. खरे तर त्याच्या जबड्याची सर्जरी झाली आहे. त्यामुळे त्याचा चेहरा नेहमी हसरा भासतो.
-भारताचा वेगवान गोलंदाज बालाजी हा तमिळस्टार रजनीकांत यांचा खूप मोठा चाहता आहे. लहानपणापासूनच त्याने त्यांचा एकही चित्रपट पाहण्याची संधी कधी सोडली नाही. तो नेहमी रजनीकांतच्या सिनेमाचा पहिला शो मोठ्या उत्साहाने पाहायला जायचा.
-पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इमरान खान यांचा बालाजी हा वयाच्या 10व्या वर्षांपासून चाहता आहे. 1992 सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यात खान यांची गोलंदाजी पाहून तो त्याप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असत.
-2001 साली त्याने राज्य स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यावर्षातील त्याच्या खेळीने नोव्हेंबर 2002 साली त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळवून दिली.
-2003 साली कसोटीत पदार्पण करणाऱ्या बालाजीने 2004 साली भारत विरुद्ध पाकिस्तानच्या ऐतिहासिक मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. यानंतर त्याला दुखापत झाल्याने मात्र पुढे काही काळ संघाबाहेर ठेवण्यात आले होते.
तरी, 2005ला पाकिस्तानविरुद्धच्याच मालिकेतून कसोटीत पदार्पण करणाऱ्या बालाजीने पहिल्या डावातच 5 पाकिस्तानी फलंदाजांना तंबूत पाठवले होते.
-लहानपणीपासूनच सतत दुखापत होणाऱ्या बालाजीला क्रिकेट क्षेत्रातील त्याच्या दुखापतींमुळेही बराच काळ संघातून बाहेर रहावे लागले होते. 2005 सालच्या कसोटी मालिकेनंतर त्याला 3 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. पुढे तो जानेवारी 2009मध्ये भारतीय संघात परत आला.
-2007 साली बालाजीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. यावेळी तमिळनाडूकडून खेळताना 2008 साली त्याच्या संघाने उपांत्य फेरी गाठली होती.
-बालाजीला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची अधिक संधी मिळाली नाही. पण, त्याने आयपीएलचे सलग 3 हंगाम धेनीच्या नेतृत्वाखाली खेळले. पुढे तो कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला.
-सीएसकेकडून पहिल्याच आयपीएल हंगामात खेळताना बालाजीने त्याचे पहिली हॅटट्रिक घेतली होती. परंतु, याच हंगामाच्या अंतिम सामन्यात मात्र त्याने शेवटच्या षटकात गोलंदाजी करत सर्वांना निराश केले होते.
-5 टी20 खेळणाऱ्या बालाजीने 12.10च्या सरासरीने एकूण10 विकेट्स घेतल्या होत्या. यावेळीच त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 5 विकेट्स घेतल्या होत्या. ज्या त्यांनी अवघ्या 19 धावा देत घेतल्या होत्या.
-बालाजी त्याच्या आयपीएल कारकिर्दीनंतर 2012 साली शेवटचा आयसीसी टी20 विश्वचषक खेळला. यावेळी आपल्या निवडीचे औचित्य साधून त्याने 9 विकेट्स मिळवल्या होत्या.
-एकमेकांसोबत 4 वर्षे घालवल्यानंतर 2013ला बालाजीने प्रिया थलूर हिच्याशी लग्न केले. ती चेन्नई येथे मॉडेल होती. त्यांच्या लग्नाला सुब्रमन्यम बद्रिनाथ, अनिरुद्ध श्रीकांत आणि मुरली विजय हे क्रिकेटपटू उपस्थित होते. ते बालाजीचे खूप जवळचे मित्र आहेत.