भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात १८ जणांना संधी देण्यात आली.
निवड समितीने व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्माकडे टी२० सह वनडे संघाचे नेतृत्वदेखील देऊ केले आहे. या दौऱ्यावर आता रोहित पूर्णवेळ वनडे संघाचा कर्णधार म्हणून काम पाहिल. (New ODI Captain Rohit Sharma) काहींनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले तर, काहींनी याबाबत उलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आज आपण रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद दिले असले तरी त्याचे होणारे काही तोटे जाणून घेणार आहोत.
१) नवे नेतृत्व नाही येणार पुढे
रोहित शर्माला वनडे संघाचे नेतृत्व देऊ केल्यानंतर याचा पहिला तोटा भारतीय संघाला नेतृत्वाच्याच बाबतीत होऊ शकतो. रोहित सध्या ३४ वर्ष वयाचा आहे. त्यामुळे त्याच्या कोण्या युवा खेळाडूला हे नेतृत्व देऊ केले असते तर, त्या खेळाडूकडे आणखी काही वर्ष नेतृत्वगुण आत्मसात करण्याची संधी असती. रोहित जास्तीत जास्त तीन वर्षे आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द पुढे नेऊ शकतो.
२) राहुल, श्रेयस व रिषभवर अन्याय
सध्या भारतीय संघातील केएल राहुल, श्रेयस अय्यर व रिषभ पंत हे खेळाडू आयपीएलमध्ये नेतृत्व करतात. हे सर्व खेळाडू तीस पेक्षा कमी वयाचे आहेत. यापैकी कोणत्या खेळाडूस नेतृत्व दिले असते तर, भविष्यकालीन योजना म्हणून या गोष्टीचे कौतुक झाले असते.
३) फलंदाजीत घेऊ शकतो दबाव
रोहित शर्मा सध्या भारताचा अव्वल सलामीवीर आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतीय फलंदाजीची अतिरिक्त जबाबदारी असते. अशा वेळी कर्णधार म्हणून धावा काढण्याचा दबाव रोहितवर असेल.
४) द्रविड यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार
रोहित शर्मा हा आता मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनला आहे. मात्र, कसोटी संघाचे नेतृत्व अजूनही विराट कोहलीकडेच असेल. अशा परिस्थितीत संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी वेळोवेळी जुळवून घेण्याची कामगिरी रोहितला करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे काय चाललंय! बलाढ्य इंग्लंड संघाचे ऍशेसमध्ये लज्जास्पद प्रदर्शन, ६ फलंदाज एकेरी धावेवर बाद
रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार